Posts

"काँग्रेसवर घराणेशाहीचे आरोप करणाऱ्या नरेंद्र मोदींनी भाजपातील घराणेशाहीचा अभ्यास करावा", नाना पटोलेंचा टोला

Image
 घराणेशाहीवरून काँग्रेसवर टीका करणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना काँग्रेसच्या घराणेशाहीमुळे पंतप्रधानपद मिळाले नाही, हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत बालीश व हास्यास्पद आहे. नेहरु, गांधी कुटुंबावर घराणेशाहीसह खोटे नाटे आरोप करून बदनामी करणे हे राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि भाजपचे एकमेव काम आहे. पंतप्रधान तेच पुढे घेऊन जात आहेत, असा टोला पटोले यांनी लगावला.  नाना पटोले म्हणाले की, नेहरु, गांधी कुटुंबावर घराणेशाहीसह खोटे नाटे आरोप करून बदनामी करणे हे राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि भाजपचे एकमेव काम आहे. पंतप्रधान तेच पुढे घेऊन जात आहेत. काँग्रेस पक्षात विविध जाती धर्मांच्या लोकांना संघटना व सत्तेत महत्वाची पदे दिली जातात. देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती, तसेच लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षाही काँग्रेस पक्षानेच दिलेल्या आहेत. पंतप्रधानपदाची संधी चालून आलेली असतानाही त्या सर्वोच्च पदाचा त्याग करून काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी यांनी डॉ. मनमोहनसिंह यांना पंतप्रधानपदा...

संसदेतून जाताना राहुल गांधींनी दिला फ्लाईंग किस; २२ महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे केली तक्रार.!

Image
  लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान आज राहुल गांधींनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. यानंतर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. राहुल गांधींनी असभ्य हावभाव केल्याचा आरोप स्मृती यांनी केला. सदनातून बाहेर पडताना राहुल गांधी यांनी फ्लाईंग किसचे हावभाव केले. या घटनेबाबत भाजप खासदार शोभा करंदलाजे यांनीही सभापती ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार केल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार शोभा करंदलाजे म्हणाल्या, "सर्व महिला सदस्यांना फ्लाईंग किस देऊन राहुल गांधी निघून गेले. एका सदस्याचे हे संपूर्ण गैरवर्तन आहे. हे सदस्याचे अयोग्य आणि असभ्य वर्तन आहे." "भारताच्या संसदेच्या इतिहासात असे कधीच घडले नाही...हे काय वर्तन आहे? ते कोणत्या प्रकारचे नेते आहेत? त्यांचे सीसीटीव्ही फुटेज तपासून त्यांच्यावर कारवाई करण्याची तक्रार आम्ही सभापतींकडे केली आहे," असे खासदार करंदलाजे म्हणाल्या. २२ महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्षांतडे तक्रारीचे पक्ष दिले आहे. स्मृती इराणी म्हणाल्या, "माझा एका गोष्टीवर आक्षेप आहे. ज्याला माझ...

'माझ्या भारत मातेची हत्या केली, तुम्ही देशद्रोही आहात'; राहुल गांधी सत्ताधाऱ्यांवर गरजले.!

Image
  आज दुसऱ्या दिवशीही अविश्वास ठरावावरील चर्चेला सुरुवात झाली. आता काँग्रेसचे खासदार राहुल गांधी अविश्वास ठरावावर बोलत आहेत. भाषणाच्या सुरुवातीला राहुल गांधी यांनी आपल्याला लोकसभेत घेतलं याबाबत लोकसभा अध्यक्षांचे आभार मानले. तसेच मागील वेळी मी जेव्हा अदानी यांच्यावर बोललो तेव्हा काहींना त्रास झाला. यावेळी मी हृदयापासून, मनापासून बोलणार असल्याचं राहुल गांधी यांनी सांगितले.  मणिपूर हिंसाचारवरुन राहलु गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपर्यंत मणिपूरला गेले नाही. वास्तव म्हणजे आता मणिपूर उरलाच नाहीय. मणिपूरमधील परिस्थिती अतिशय भयानक आहे. मोदींनी मणिपूरचे विभाजन केले. मोदी सरकारने मणिपूरची हत्या केली, असा घणाघात राहुल गांधी यांनी यावेळी केला. मी जेव्हा मणिपूरला गेलो होतो, तेव्हा तेथील स्थानिक नागरिकांशी, पीडित लोकांसोबत संवाद साधला. त्यावेळी एक महिला म्हणाली की, माझ्या डोळ्यांसमोर मुलाची गोळ्या घालून हत्या केली. रात्रभर ती आई त्या मृतदेहासोबत राहिली, असं राहुल गांधी यांनी सांगितले. मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या केली. तुम्ही देशद्रोही आहात. तुम्ही देशभक्त...

"राहुल गांधी, तुमच्यात जर हिंमत असेल तर..."; स्मृती इराणी यांनी संसदेतच दिलं खुलं आव्हान

Image
 संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकार विरोधात अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. या वेळी राहुल गांधींनी मोदी सरकारवर बोचऱ्या शब्दांत टीका केली. राहुल गांधींच्या भाषणाला स्मृती इराणी यांनी प्रत्युत्तर दिले. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मणिपूरच्या हिंसाचारावर मौन बाळगले. यातून असे दिसून येते की, मोदी सरकारने मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या केली," असा घणाघाती आरोप राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात केला. यावर स्मृती इराणी यांनी काँग्रेस सरकारच्या कार्यकाळातील हिंसेच्या घटना व अत्याचाराच्या घटनांविषयी मांडणी केली. तसेच, राहुल गांधींना संसदेतूनच थेट आव्हान दिले. राहुल गांधी, तुमच्यात हिंमत असेल तर...  "देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतमातेच्या हत्येची चर्चा झाली. त्यातही अशा विधानांवर काँग्रेस पक्ष इथे बाकं वाजवत होता, टाळ्या वाजवत राहिला. भारतमातेच्या हत्येच्या गोष्टींवर टाळ्या वाजवून यांनी साऱ्या देशाला सूचित केले की नक्की कोणाच्या मनात विश्वासघाताची भावना आहे. मणिपूरचे तुकडे अजिबात झालेले नाहीत, तो विभागलेला नाही. तो अजूनही देश...

बीआरएसच्या सोलापुरातील नेत्यांनी आम्हाला फसवून पक्षप्रवेश घडवून आणला परतताच गौप्यस्फोट, 'आम्हाला फसवले'

Image
  दक्षिण सोलापूर तालुक्यातील भाजपचे काही सरंपच, माजी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य अशा एकूण ५२ सोमवारी हैदराबादेत बीआरएस पक्षात प्रवेश केला. परंतु, हा कार्यक्रम म्हणजे पक्षप्रवेश नव्हता. बीआरएसच्या सोलापुरातील नेत्यांनी आम्हाला फसवून पक्षप्रवेश घडवून आणला, असे स्पष्टीकरण येळेगावचे आज जाहीर स्पष्टीकरण देणार, उपसरपंचाकडे बोट सरपंच संजयकुमार लोणारी आणि इतरांनी 'लोकमत'ला दिले.  हैदराबादच्या विधानभवनात तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमाचे प्रक्षेपण बीआरएसच्या सोशल मीडियावरील पेजवर उपलब्ध आहे. या कार्यक्रमाला हजर असलेले बहुतांश लोक सोलापूर दक्षिण आणि अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्ते आहेत. भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी यावर तिखट प्रतिक्रिया दिली परंतु आमचा पक्षप्रवेश झालेलाच नाही, असा दावा सरपंचांनी केला. त्यामुळे बीआरएसच्या नेत्यांची कोंडी झाली. काय घडले हैदराबादेत? हैदराबाद आणि परिसरातील गावांचा विकास कसा झाला याची माहिती घेऊया म्हणून नागेश वल्याळ आणि सचिन सोनटक्के ५२ जणांना ह...

बाबरी पडण्याआधी पंतप्रधान राव यांना सतर्क केलं होतं, की...; शरद पवारांचा खुलासा

Image
  रामजन्मभूमी आंदोलन वाढत चाललं होतं. तेव्हा भाजपा नेते विजयाराजे शिंदेंनी तत्कालीन पंतप्रधान पीवी नरसिम्हा राव यांना बाबरी मस्जिदला काही होणार नाही असं आश्वासन दिले होते. त्यावेळी सहकारी मंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्याविरोधात पंतप्रधान नरसिम्हा राव यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला असा खुलासा खासदार शरद पवार यांनी केला आहे.  ज्येष्ठ पत्रकार नीरज चौधरी यांचं पुस्तक हाऊ प्राईम मिनिस्टर्स डिसाइड च्या प्रकाशनावेळी संरक्षण मंत्री असलेले शरद पवार म्हणाले की, मी तत्कालीन गृहमंत्री आणि गृह सचिवांसोबत त्या बैठकीत उपस्थित होतो. बाबरी मस्जिदला काही होणार नाही असं विजयाराजे शिंदे यांनी तेव्हाचे पंतप्रधान नरसिम्हा राव यांना आश्वासन दिले होते. गृहमंत्री आणि गृहसचिवांना वाटत होतं काहीतरी होऊ शकते. परंतु पंतप्रधानांनी विजयाराजे यांच्यावर विश्वास ठेवला. यावेळी नीरजा चौधरी यांच्यासह अन्य पत्रकारांनी पंतप्रधान राव यांच्याशी संवाद साधत तुम्ही विवादित ढाचा पाडताना कुठे होता असा प्रश्न विचारला होता. राव यांनी पत्रकारांना सांगितले की, मी यासाठी होऊ दिले जेणेकरून ही गंभीर मुद्दा संपून जाईल आणि भाजपा त्या...

तुम्हाला सत्तेत पण राहायचे आणि टीकाही करायची या दोन्ही एकत्र कशा होऊ शकतात..?NDA च्या बैठकीत पंतप्रधान मोदी उद्धव ठाकरेंवर बरसले;

Image
 गेल्या आठवड्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी एनडीएच्या खासदारांची बैठक घेत आहे. मंगळवारी महाराष्ट्रातील एनडीए खासदारांची बैठक मोदींनी घेतली. या बैठकीत मोदींनी २०४७ पर्यंत भारताला विकसित देश बनवायचा आहे. त्याचसोबत आगामी निवडणुकीसाठी खासदारांना कानमंत्र दिले. या बैठकीत मोदींनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. भाजपा काँग्रेससारखी अहंकारी नाही असं मोदींनी सांगितले.  सूत्रांच्या माहितीनुसार, एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदी म्हणाले की, ज्या लोकांनी सत्तेत राहून चुकीची कामे केली मी त्याचे तिकीटही कापले आहे. निवडणूक प्रचारात चुकीसाठी माफीही मागितली आहे. काँग्रेस आणि शरद पवारांनी घराणेशाहीत अनेक कर्तृत्वान लोकांना पुढे येता आले नाही. जेव्हा पंतप्रधान बनल्यानंतर मी राष्ट्रपती प्रणब मुखर्जींना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी म्हटलं, तुमच्या पक्षाने पहिल्यांदाच पंतप्रधानपदाचा उमेदवार तुम्हाला बनवलं आणि तुमच्या नावावर बहुमत मिळाले असंही त्यांनी सांगितले. तसेच आम्ही शिवसेनेसोबत युती तोडली नाही तर त्यांनी तोडली. २०१४ पासून शिवसेना युतीत असूनही त्यांचे मुखपत्र सामनातून स...