''त्यांना यातलं काहीच कळत नव्हतं...'', शरद पवारांच्या पुस्तकाचा दाखला देऊन फडणवीसांचा ठाकरेंवर हल्ला

  आज नाशिक येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची उपस्थिती होती. यावेळी बोलतांना देवेंद्र फडणवीस यांनी तुफान फटकेबाजी करीत उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमच्या आधीच्या मुख्यमंत्र्यांचं वाक्य ठरलं होतं. मला अर्थसंकल्पातलं फार कळत नाही, मला सहकारातलं काहीच कळत नाही, मला शेतीतलं काहीच कळत नाही.. शेवटी पवार साहेबांनी पुस्तक लिहिलं त्याच्यात सांगितलं त्यांना राजकारणातलं काहीच कळत नाही. परंतु आता असं नाही. आम्हांला राजकारणातलंही कळतं, सहकार, शेती आणि अर्थसंकल्पामधलंही कळतं

फडणवीस पुढे म्हणाले, आता जे निर्णय होतील ते सगळे निर्णय सामान्य माणसांच्या हिताचे होतील. शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये विमा देण्याचा निर्णय आपण घेतला, हा एक ऐतिहासिक निर्णय आहे. शेतकरी सन्मान निधाच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना १२ हजार रुपये मिळतात. हा नाशिक जिल्हा आहे, कुंभमेळ्याचा जिल्हा आहे. शासन आपल्या दारी हा शासकीय योजनांचा कुंभमेळाच आहे. आपली सेवा करण्याची संधी मिळाली त्यामुळे आनंद आहे.विरोधकांबद्दल बोलतांना देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, चांगलं काम केलं, लाभ दिला तरी पोटात दुखतं. परंतु लोकांना लाभ मिळतो म्हणून लोकं येतात, हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. परंतु कुणाच्याही पोटात दुखलं तरी डॉक्टर एकनाथ शिंदे आम्ही आणलेले आहेत. त्यांच्या पचनी पडलं नाही तर अजितदादा सोबत आहेतच. अजितदादा मागच्या कार्यक्रमात म्हणाले होते की, दोनच झेंडे आहेत. मात्र आ
 तिनही पक्षांचे झेंडे याठिकाणी आहेत.

Comments

Popular posts from this blog

CM शिंदेंसह, अजित पवारांची शहांसोबत चर्चा ; पुण्यात मध्यरात्रीपर्यंत नेत्यांमध्ये खलबतं..

सरकारी रुग्णालयांत 15 ऑगस्टपासून सर्व वैद्यकीय सेवा मोफत; सरकारचा मोठा निर्णय

Breaking-:मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी मंत्री नवाब मलिक यांना अखेर जामीन मंजूर..